ज्वारी लागवड पद्धत
ज्वारी बियाणे प्रमाण

ज्वारी बीज प्रक्रिया

जमीनमध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकून रहात असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामु असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते. रब्बी ज्वारीची पेरणी मोठया प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते. जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी वाणाची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी.पूर्व मशागतपावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळयात शेती मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडी कचरा धसकटे वेचून शेत साफ करावे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमीनीच्या उतारावर वाफे तयार करावेत. (३.६० x ३.६० चौ.मी. आकाराचे) वाफे तयार करतांना सारा यंत्राने सारे करुन त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात. तसेच ट्रॅक्टर चलीत यंत्राने एकावेळी (६.०० ४ २.०० चौ.मी.) आकारचे वाफे तयार करता येतात. सदर वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करावेत म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ आक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहे तेव्हा १५ सप्टेंबर पूर्वी ४५ दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे तयार करावे. पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवावा. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी व पून्हा सारा यंत्राच्या सहायाने गहू हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो आडवून जिरवता येईल. या तंत्राला मुलस्थानी पाणी व्यवस्थापन असे म्हटले जाते. या तंत्रामुळे रब्बी ज्वारीचे ३०-३५ टक्के उत्पादनात वाढ होते.
सुधारित वाण
कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित/संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत.
१) हलकी जमीन (खोली ३० सें.मी. पर्यत) : फुले अनुराधा, फुले माऊलो.
२) मध्यम जमीन (खोली ६० सें.मी. पर्यत) : फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी-३५-१.
३) भारी जमीन (६० सें.मी. पेक्षा जास्त) : सुधारित वाण:फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही.२२, पी. के. व्ही. क्रांती परभणी मोती, संकरित वाण : सी. एस. एच. १५ आणि सी. एस. एच. १९.
४) बागायतीसाठी : फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्ही. १८, सी. एस. एच. १५ व सी. एस. एच. १९.
५) हुरड्यासाठी वाण : फुले उत्तरा, फुले मधुर.
६) लाह्यांसाठी वाण : फुले पंचमी.
७) पापडासाठी वाण : फुले रोहीणी.
पेरणी
रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यत करावी. ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी १.४८ लाख रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता ज्वारीची पेरणी ४५४१५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावेत. बागायत ज्वारीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५४ १२ सें.मी.अंतरावर करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करुन हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
रब्बी ज्वारीचे संकरित व सुधारित वाण नत्र खतास चांगला प्रतिसाद देतात.
नत्र दोन हप्त्यात (पेरणीचेवेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे.कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून घ्यावे.
पीक फेरपालट
खरीपात मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेऊन नंतर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली असता २० ते ३० किलो नत्राची बचत होते. तथापि, सोयाबीन-रब्बी ज्वारी हा पीक क्रम विशेषतः बागायतीसाठी आर्थिकदृष्टया आणि अधिक उत्पादनासाठी फायदेशीर दिसून आला आहे.
आंतरमशागत
पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवणे महत्वाचे आहे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी आणि ३ वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवडयांनी फटीच्या कोळप्याने, दुसरी पेरणीनंतर ५ आठवडयांनी पासेच्या कोळप्याने आणि तिसरी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल व शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरुन ठेवण्यास मदत होईल.
कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनाचा वापर
हिवाळयात किंवा अगोदरचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची नांगरट करावी. चैत्र-वैशाख महिन्यात पहिली कुळवाची/ वखराची खोल पाळी द्यावी. त्यानंतर २ ते ३ वेळा वखराच्या पाळया दयाव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी ५ ते ६ टन शेणखत प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे.
पेरणीची वेळ
नैऋत्य मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यावर वापसा येताच पेरणी लवकर करावी (शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवडयात) पाण्याची सोय असल्यास जूनच्या शेवटच्या आठवडयात पेरणी करावी. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव कमी होतो.
रासायनिक खतांचा वापर
खरीप ज्वारीस १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. खरीप ज्वारीस १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम हे जिवाणू खत चोळावे. त्यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते.
पेरणी
पेरणी तिफणीने/दोन चाडयाच्या पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपातील १५ सें.मी. इतके अंतर ठेवावे. पेरणीस हेक्टरी १० किलो सुधारित बियाणे वापरावे.
विरळणी
पहिली विरळणी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी आणि दुसरी विरळणी पेरणीनंतर २०-२२ दिवसांनी करावी. विरळणीनंतर १.८० लाख पर्यंत योग्य रोपांची संख्या ठेवावी.
आंतरपिके व क्रमवार पिके
पटटा पध्दतीने तूर हे आंतरपीक २:१ या प्रमाणात घ्यावे (दोन ओळी ज्वारीच्या व एक ओळ तुरीची किंवा दोन पाभरी ज्वारीच्या व एक पाभर तुरीची पेरावी). तसेच तूर ऐवजी मूग, उडीद व चवळी यासारखी आंतरपीके देखील घेता येतात.
पाणी व्यवस्थापन
ज्वारीच्या पिकास, पिकाचा जोमदार वाढीचा काळ (२८ ते ३० दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस), फुलो-यात येण्याचा काळ (८० ते ९० दिवस) व दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस) या चार अवस्थेत जरुरीप्रमाणे शक्य झाल्यास पाणी द्यावे. पाणी शक्यतो सारा पध्दतीनेच द्यावे.
आंतरमशागत
खरीपात तणांचा प्रार्दुभाव जास्त असल्यामुळे दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. खुरपणी व कोळपणी पीक पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांपूर्वी करावी. शक्य झाल्यास अॅट्रॅझीन हे तणनाशक हेक्टरी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर परंतु बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर सारख्या प्रमाणात फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर एक निंदणी किंवा कोळपणी करावी.
पीक संरक्षण
अ) किडी :
• खोडमाशी :
या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच २५% प्रवाही क्विनॉलफॉस २५% ई.सी. १५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून उगवणीनंतर ७ दिवसांनी फवारणी करावी. दुसरी फवारणी एक आठवड्यांने करावी.
• खोडकिडा :
या किडीच्या बंदोबस्तासाठी क्विनॉलफॉस ५% जी. (दाणेदार) १५ किलो हेक्टरी या प्रमाणात पोंग्यात टाकावे.
• लष्करी अळी व कणसातील अळी :
या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन ५ टक्के डी.पी. (भुकटी) प्रति हेक्टरी २० किलो या प्रमाणात वारा शांत असतांना धुरळणी करावी.
एकात्मिक कीड नियंत्रण
हे एक व्यवस्थापन तंत्र आहे. या तंत्रामध्ये उपलब्ध असलेल्या निरनिराळया कीड नियंत्रण उपायांचा समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली नियंत्रित केली जाते.
१) उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील अळया व इतर किडी उघडया पडून भक्षस्थानी पडतील किंवा सूर्यप्रकाशामुळे नाश पावतील.
२) ज्वारीची पेरणी मान्सूनचा पाऊस पडताच लवकर करावी.
३) बियाणे हेक्टरी १० किलो ऐवजी १२ किलो वापरावे. तीन ते चार आठवडयांनी विरळणी करुन खोडमाशीग्रस्त झाडे उपटून टाकावीत.
 ४) कीड प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी. उदा. सुधारित वाण एस.पी.व्ही.-४६२, सी.एस.व्ही.-१३, सी.एस.व्ही.-१५ आणि सी.एस.व्ही.-२३ ह्या खोडमाशी प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी. बियाण्यास इमिडॅक्लोप्रीड ४८ एफ.एस. १० मि.ली. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
५) मावा, तुडतुडे, इत्यादी रस शोषण करणाऱ्या किडींसाठी बांधाकडील जमिनीची चांगली मशागत करावी. वसावा होणारी मोठी झाडे तोडून टाकावीत
६) किडींचा पूर्ण नाश न करता त्यांची संख्या पिकांचे आर्थिक नुकसान करणार नाही अशा पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन नैसर्गिक समतोल साधला जाईल, हा एकात्मिक कीड नियंत्रणाचा उददेश आहे. त्यामुळे अवाजवी फवारणी कमी होईल आणि शेतकऱ्यांचा होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल.
७) लिंबोळीपासून तयार केलेले द्रावण फवारणीसाठी वापरावे. जेणेकरुन पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्यास मदत होईल.
८) किडींची संख्या जेव्हा नेमकी आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जाण्याचा संभव आहे तेव्हांच कीटकनाशकांची फवारणी करावी.
९) खतांचा व पाण्याचा वापर योग्य व आवश्यकतेनुसार करावा.
ब) रोग :
• करपा :
या रोगामुळे पाने करपतात व नंतर जळतात. यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.</string>
• काणी :
काणीच्या नियंत्रणासाठी ज्वारीच्या १ किलो बियाण्यास ४ ग्रॅम (३०० मेश पोताची) गंधकाची भुकटी चोळून पेरणी करावी झिप्री किंवा काळा गोसावी या रोगाची झाडे दिसताच नष्ट करावी. त्यामुळे रोगाचा प्रसार थांबण्यास मदत होईल.</string>
• दाण्यावरील बुरशी (ग्रेनमोल्ड) :
या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम ७५% डब्ल्यु. एस. २० ग्रॅम १० लिटर पाण्यातून पिक फुलोऱ्यानंतर फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी किंवा दाणे पक्व अवस्थेत असतांना व तिसरी फवारणी पाऊस असल्यास करावी.</string>
कापणी व मळणी
कणसाचा दांडा पिवळा झाला म्हणजे पीक तयार झाले असे समजावे. कणसाच्या खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर पिकाची काढणी करावी. तसेच कणसातील दाण्याचा खालचा भाग काळा झाला म्हणजे पीक काढणीस तयार होते. कापणीच्या वेळेस साधारणपणे १७ ते १८ टक्के ओलाव्याचे प्रमाण असते. सुरक्षित साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० ते ११ टक्के असावा.
उत्पादन
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सुधारित वाणांपासून हेक्टरी २५ ते ३० क्विंटल तर संकरित वाणापासून हेक्टरी ४० ते ४५ किंटल धान्य उत्पादन येते.